loader image
[ays_poll id=7]

जिल्ह्यात कोरोना निर्बंध शिथिल : पर्यटन क्षेत्र बहरणार

Feb 1, 2022


कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने प्रशासनाने पर्यटनस्थळांवर लागू केलेले निर्बंध पूर्णपणे उठवनिण्याचा निर्णय घेतला असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले. मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळून पर्यटनाला परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार पाचशे ने घटली असून शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचे कुठेही पुढे आलेले नाही त्यामुळे आता वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी मोबाईल व्हॅन सुरू केल्या असून पहिला डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ८३ तर दुसरा डोस घेणाऱ्यांची जेमतेम ५५ टक्के आहे.मेडिकल दुकानातही आता डोस उपलब्ध झाले आहेत.याप्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे,पोलीस आयुक्त दीपक पांडे,महापालिका आयुक्त कैलास जाधव,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
.