loader image
[ays_poll id=7]

मनमाड न्यायालयात लोकअदालतीत २६१ प्रकरणे निकाली

Mar 14, 2022


मनमाड : मनमाड न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये एकूण ३२४७ पैकी २६१ प्रकरणांचा निपटारा करण्यात येवून ६६ लाख ४६ हजार ३८४ रूपये वसुल करण्यात आले . त्यामध्ये दाखलपूर्व २७६६ प्रकरणांपैकी १६५ प्रकरणांचा निकाल लावण्यात येवून २ ९ लाख ४१ हजार ५०५ रूपये तर प्रलंबित ४६१ प्रकरणांपैकी ९ ६ प्रकरणांचा निकाल होवून ३७ लाख ०४ हजार ८७ ९ रूपये वसुल करण्यात आले.

            मनमाड न्यायालयात ज्युडीशियल मॅजेस्ट्रेट शलाका लोमटे व रेल्वेचे न्यायाधिश गणेश घुले यांच्या मार्गदर्शनाखाली वकील संघाचे अध्यक्ष अॅड . सुधाकर मोरे तसेच द्विसदस्यीय बेंच सदस्य अॅड . ए.के. निकम व ॲड.ए.एस. पठाण यांनी या राष्ट्रीय लोकअदालतीचे संयोजन केले . मनमाड वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड . राजेंद्र पालवे , सचिव अॅड . किशोर चोरडिया , सहसचिव अॅड . बापट , अॅड . राजेंद्र पांडे , अॅड . नासिर पठाण , अॅड . के . एस . मल्हारे , ॲड.पी.के.मुलचंदानी , ॲड.के. एस . संसारे तसेच २१ न्यायालयीन कर्मचाऱ्यांसह बँक , नगरपालिका , पतसंस्था , ग्रामपंचायत , महावितरण यांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते . 

               बँक व पतसंस्था यातील दाखलपूर्व ५९५ पैकी १८ प्रकरणांचा निकाल होवून २४ लाख ७७ हजार ९ ५० रूपयांची वसुली झाली . गुन्हेगारी केसेसमधील प्रलंबित २२८ प्रकरणांपैकी ३६ प्रकरणे निकाली काढण्यात आली . महावितरणच्या दाखलपूर्व ८८४ प्रकरणांमधून ६ प्रकरणे निकाली होवून ५० हजार ९१० रूपये वसुल करण्यात आले . मनमाड नगरपालिकेच्या विविध प्रलंबित कर आकारणीच्या १४१ दाखलपूर्व प्रकरणापैकी ८ प्रकरणांचा निकाल होवून १ लाख ७४ हजार १७७ रूपये वसुल झाले.

        मॅट्रीमोनिअल प्रलंबित ३४ पैकी ७ प्रकरणे निकाली झाली . तर एनआय अॅक्टच्या १३८ कलमाखालील प्रलंबित १६७ पैकी २६ प्रकरणांचा निपटारा करण्यात येवून त्यातून ३७ लाख १ हजार २ ९ रूपये वसुल करण्यात आले.

        तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीमधील दाखलपूर्व ११४६ प्रकरणांपैकी १३३ चा निकाल लावण्यात येवून २ लाख ३८ हजार ४६८ रूपयांची वसुली झाली तर प्रलंबित २८ पैकी ३ प्रकरणांचा निकाल झाला . तर इतर प्रलंबित २४ पेट्टी केसेस पैकी सर्व प्रकरणांचा निकाल होवून ३ हजार ८५० रूपये वसुल झाले . रेल्वे कोर्टातील १९२ गुन्हेगारी केसेस पैकी ३० केसेस निकालासाठी ठेवण्यात आल्या होत्या.परंतु यापैकी एकाही प्रकरणाचा निकाल होवू शकला नाही. 

मनमाड न्यायालय व रेल्वे न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने मार्चमध्ये घेण्यात आलेल्या या राष्ट्रीय लोकअदालतीसमोर ठेवण्यात आलेल्या ३२४७ पैकी फक्त २६१ प्रकरणांचा निकाल लागला.निकालाचे हे प्रमाण अवघे ८.०४ टक्के राहिले आहे.

फोटो : 


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
.