loader image
[ays_poll id=7]

अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी एप्रिल महिन्यातही राहणार शाळा पूर्णवेळ सुरू

Mar 29, 2022


कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. उन्हाळी सुट्टी रद्द करत एप्रिल महिन्यातही शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडून मागणी करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर हा शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

गेली दोन वर्ष कोरोनामुळे शाळांमध्ये विस्कळीतपणा आला होता, तो दूर करण्याची मागणी शिक्षक, पालक यांच्याकडून केली जात होती. त्यामुळे हे नुकसान भरून काढण्यासाठी एप्रिलमध्ये पूर्णवेळ शाळा सुरु ठेवण्याची मुभा शासनाने दिली आहे. १०० टक्के क्षमतेने शाळा सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एवढंच नव्हे तर रविवारी देखील शाळा सुरु ठेवण्याची मुभा आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.

कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला होता. परंतु, ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा आल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांकडून शाळा पुन्हा सुरु करण्याची मागणी केली जात होती. दरम्यान, आता शिक्षण विभागाने अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता उन्हाळी सुट्ट्या रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा मात्र विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त अभ्यासच करावा लागणार आहे.


अजून बातम्या वाचा..

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
.