loader image
[ays_poll id=7]

संपूर्ण राज्यात उन्हाचा पारा चढताच; पुढील ५ दिवसात येऊ शकते उष्णतेची तीव्र लाट

Apr 29, 2022


महाराष्ट्रात मे महिन्याच्या सुरूवातीलाच उष्णतेच्या लाटेचे संकेत देण्यात आले आहेत. भारतीय हवामान विभागाने येत्या ५ दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अलर्ट दिला आहे. विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा आयएमडीने दिला आहे. तर आज दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
येत्या ५ दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. आगामी ३० एप्रिल ते २ मे या कालावधीत विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मे महिन्याच्या सुरूवातीलाच अकोला, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर या भागामध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याआधी अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेसाठी सावधानतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात अनेक भागात उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी गाठली आहे. अनेक ठिकाणी सरासरी तापमान हे ४० डिग्री सेल्सिअस इतके आहे. सर्वाधिक अशा तापमानाची नोंद ही ब्रम्हपूरी, वर्धा, अकोला आणि जळगाव येथे झाली आहे. याठिकाणी तापमानाचा पारा हा ४५ डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक होता. राज्यात अकोल्यात सर्वाधिक अशी ४५.४ इतकी तापमानाची नोंद झाली. याठिकाणी ०.६ डिग्री सेल्सिअस अशी एकाच दिवसात झालेली वाढ आहे. विदर्भात सर्वाधिक अशा तापमानाची नोंद अनेक जिल्ह्यात झाली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक अशी तापमानाची नोंद झालेली आहे.


अजून बातम्या वाचा..

मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

प्रतिनिधी मनमाड - येथील मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेमध्ये मंडळ श्रीमती इती पांडे...

read more
राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
.