loader image
[ays_poll id=7]

निवडणूक आयोग लागले कामाला ; महापालिकांच्या निवडणुका लवकरच

May 11, 2022


कोरोना महामारीमुळे रखडलेल्या महापालिका निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. सुप्रीम कोर्टाने २आठवड्यात राज्य सरकारला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राज्य सरकारने निवडणूक आयोगासोबत बैठक घेऊन प्रक्रियेस सुरुवात केली आहे.
निवडणूक आयोगाने आज याबाबत महत्त्वाचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने महापालिकांना निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी डेडलाईन दिली आहे.

11 मे – अंतिम प्रभाग रचना काम पूर्ण करणे

१२ मे – प्रभाग रचना अंतिम प्रस्ताव राज्य निवडणुक आयोगाकडे मान्यता पाठवावी

१७ मे – अंतिम प्रभाग रचना अंतिम प्रसिद्ध करावी

१७ मे – अंतिम प्रभाग रचना यादी शासन राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे.

राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, नवी मुंबई वसई विरार उल्हासनगर कोल्हापूर अकोला सोलापूर नाशिक , पिपंरी चिंचवड, कल्याण डोंबिवली महापालिकांना निवडणूक आयोगाने पत्र पाठवले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोग अॅक्शन मोडमध्ये आलाय. राज्य शासनानं ट्रिपल टेस्ट आणि इम्पिरिकल डेटा सादर न केल्यानं या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार आहेत. याप्रकरणी 12 जूनला सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी होणार आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.