loader image
[ays_poll id=7]

राज्यस्तरावर आघाडी एकत्रच लढणार मात्र जिल्हास्तरावर स्थानिक परिस्थतीनुसार लढविल्या जातील निवडणुका : अजित पवार

May 12, 2022


येत्या काही दिवसात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार का? असा सवाल उपस्थित होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, आगामी निवडणुकीत राज्यस्तरावर महविकास आघाडीनं एकत्र लढली जावी असे आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र जिल्हा स्तरावर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यायचा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, नाना पटोले यांनी खंजीर खुपसण्याचं वक्तव्य केलं हे हास्यास्पद आहे. मात्र नाना पटोले कुठल्या पक्षातून आले आहेत, हे सर्वांना माहिती आहे. मग भाजपने म्हणायचं का की नाना पटोले यांनी पाठीत खंजीर खुपसला, असा टोला त्यांनी लगावत पटोलेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. अजित पवार म्हणाले की, राज्य स्तरावर वेगळे निर्णय असतात आणि स्थानिक पातळीवर वेगळे निर्णय होत असतात. काँग्रेसला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तसाच आम्हाला देखील पक्ष वाढवण्याच्या अधिकार आहे. राज्यस्तरावर आमची शरद पवार यांनी बैठक घेतली होती. त्यामधे त्यांनी देखील आम्हाला हेच सांगितलं आहे. नाना पटोले यांनी सांगावं की त्यांनी आधी काँग्रेस सोडून भाजप, मग भाजप सोडून काँग्रेसमध्ये आले. झाकली मूठ सव्वा लाखाची असते, असे ही ते म्हणाले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.