loader image
[ays_poll id=7]

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांची निवडणूक जाहीर !

May 12, 2022


महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांवरील मतदानाची तारीख जाहीर करण्यात आला आली आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून येत्या १० जूनला मतदान होणार असल्याची शक्यता आहे.उमेदवारांना ३१ मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. राजकीयदृष्ट्या ही निवडणूक फार महत्त्वाची मानली जात आहे. या निवडणुकीसाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती अपक्ष लढणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. यामुळे संभाजीराजेंचे आव्हान एका जागेसाठी राहणार आहेत.
महाराष्ट्रातील ६ खासदारांचा राज्यसभेवरील कार्यकाळ ३ मे रोजी संपु्ष्टात आला आहे. यामध्ये संजय राऊत, प्रफुल पटेल, पी.चिदंबरम, पियूष गोयल, विनय सहस्रबुद्धे, विकास महात्मे यांची मुदत संपली आहे. मुदत संपलेल्या खसादारांपैकी ३ खासदार भाजपचे तर ३ खासदार महाविकास आघाडीचे आहेत. यातील भाजपकडून राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे छत्रपती यांना संधी देण्यात आली होती. परंतु संभाजीराजेंनी एकला चलोची भूमिका घेतल्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. राज्यसभेच्या या ६ रिक्त जागा तात्काळ भरुन काढण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १५ राज्यातील ५७ राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामधील महाराष्ट्रातील ६ जागा आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आणि भाजप खासदारांनी निवड बिनविरोध करण्याची शक्यता आहे. परंतु निवडणूक घेण्याची वेळ आली तर १० जूनला मतदान होऊ शकते.

शिवसेनेकडून संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफूल्ल पटेल, काँग्रेसकडून पी.चिदंबरम यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यात येणार आहे. तर भाजपकडून पीयूष गोयल केंद्रीय मंत्री असल्यामुळे पुन्हा राज्यसभेवर जाऊ शकतात तर विनय सहस्त्रबुद्धे यांना पुन्हा संधी देण्यात येऊ शकते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.