युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर करत होऊ घातलेल्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष लढणार असल्याची घोषणा त्यांनी ह्यावेळी केली संभाजीराजेंचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर ते पुढे काय पाऊल उचलतात ह्याकडे सर्वांचे लक्ष लागून होते परंतु आता राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजेंनी केली आहे. तसेच भाजपमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. संभाजीराजेंनी स्वराज्य या संघटनेची घोषणा ह्यावेळी केली. सगळ्या मराठा समाजला एका छताखाली आणण्यासाठी ही संघटना स्थापन केली असल्याची खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली राजकीय भूमिका जाहीर केली आहे. यावेळी संभाजीराजे म्हणाले की, दोन निर्णय मी घेतले आहेत. त्यातील पहिला निर्णय हा राज्यसभेच्या संदर्भात आहे. राज्यसभेचं समीकरण पाहिले असेल तर येत्या जुलैमध्ये ६ जागा रिक्त होणार आहेत. पूर्वीचे समीकरण काय तर ३ जागा भाजप, १ राष्ट्रवादी, १ शिवसेना आणि १ जागा काँग्रेस असे सहा जागांचे समीकरण आहे. परंतु आताचे समीकरण आहे की, २ जागा भाजप, १ राष्ट्रवादी, १ शिवसेना सहाव्या जागेचं संख्याबळ कमी असल्यामुळे कुठलाही एक पक्ष आणि कुठलीही १ आघाडी करु शकत नाही असे संभाजीराजेंनी सांगितले .
मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा 102 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
मनमाड - येथील मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये ३ जुलै 2024 रोजी...










