loader image
[ays_poll id=7]

नांदगाव शहरातील बहुचर्चीत मटन मार्केट अखेर जमीनदोस्त

May 17, 2022


नांदगाव तालुक्यात सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील शाकांबरी व लेडीं नदीला आलेल्या महापूरा ने शहराचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते
महापूराच्या पार्श्वभूमीवर व  मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आणि भुसावळ रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक निरीक्षण अहवाला नुसार मटन मार्केट वाहतुकीसाठी अडथळा ठरत असल्याने आज अखेर  मटन मार्केटसह गांधी चौक फरशी पुलावरील तसेच समता मार्ग(पंचाळ गल्ली) येथील अतिक्रमण काढण्यात आले. कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून कारवाईच्या वेळी सकाळ पासून बंदोबस्त लावण्यात आला होता..
आज सकाळी मुख्यधिकारी तथा प्रशासक विवेक धांंडे यांना
मटन माक्रेट मधील अतिक्रमण धारकांनी आठ दिवसाचा अवधी मिळावा अशी मागणी केली होती. मात्र अवधी मिळणार नसल्याचे मुख्यधिकारी धांडे यांनी स्पष्ट सांगितले.अखेर मटन मार्केट मधील गाळे धारकांनी मार्केट मधील  सामान हलविण्यासाठी काही वेळेचा अवधी देण्यात यावा अशी मागणी केली ‘काही वेळेचा अवधी देण्यात आला. त्यानंतर मटन मार्केट हटविण्यात आले .त्यानंतर गांंधी चौक फरशीवर पुलावरील अतिक्रमण धारकांनी स्वता:हुन आपली अतिक्रमणे (टपरी) काढून घेतली यानंतर समता मार्ग(पंचाळ गल्ली) टपरी धारकांनी आम्हाला सुध्दा टपरी हटविण्यासाठी वेळ मागून घेतला..काही तासानंतर स्वताहून टपऱ्या हटविण्यात आल्या आहेत..तसेच नवीन शॉपिंग सेंटरच्या जवळपास असलेले अतिक्रमणे काढण्यात आली.यावेळी पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अतिक्रमण मोहिमेत मुख्याधिकारी  तथा प्रशासक विवेक धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल कुटे, बंडू कायस्थ, गणेश पाटील, अरुण निकम, मनमाड प्रभारी इंजिनिअर मयूर चौधरी,सुनील पाटील, अमृत काजळे श्रीमती मोरे, धनवटे, चोपडे, आनंद महिरे, तसेच मनमाड अग्निशमन दल,मनमाड नगरपरिषद कर्मचारी सहभागी झाले होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.