loader image
[ays_poll id=7]

औरंगाबादची तोफ ठरली ‘भारतातील सर्वात लहान तोफ’.

May 19, 2022



औरंगाबादेतील औद्योगिक व्यवसायात कार्यरत असणारे, विठ्ठल उत्तमराव गोरे यांनी बनवलेल्या भारतातील लहान तोफेची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नुकतीच करण्यात आली. वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील शेतकरी कुटुंबातून आलेले विठ्ठल गोरे यांचा ‘शिव कृष्णा इंडस्ट्रीज’ नावाने मशिनरी बनवण्याचा कारखाना आहे. सोबतच त्यांना ऐतिहासिक वस्तू, शस्त्रे बनवण्याचा छंद आहे. या छंदातून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या तोफांची निर्मिती केलेली आहे. त्यांनी अलिकडेच एक अत्यंत लहान पितळी तोफ बनवली होती. तिची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने घेतली असून, तसं सर्टिफिकेट विठ्ठल गोरे यांना नुकतंच प्राप्त झालं. ऐतिहासिक औरंगाबाद शहरात एका सूक्ष्म तोफेची भर टाकून त्यांनी शहराचा मान आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी बनवलेली तोफ ही भारतातील सर्वात लहान तोफ आहे. तीची लांबी 5 मिलीमीटर असून उंची केवळ 2.7 मिलीमीटर आहे. वजन केवळ 140 मिलिग्रॅम आहे. ही तोफ अस्सल तोफेप्रमाणे उडवताही येऊ शकते.
गडकिल्ले भ्रमंतीसोबतच मोडिलिपी, ब्राम्ही लिपी आशा जुन्या लिपींचाही प्रसार करण्यासाठीही विठ्ठल गोरे यांचं मोलाचं योगदान आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.