loader image
[ays_poll id=7]

लष्करी जवानाचा आपल्या एकुलत्या एक मुलासह नगर जवळ कार अपघातात मृत्यू

May 24, 2022


भावाच्या वर्षश्राद्धासाठी सुट्टीवर घरी आलेल्या लष्करी जवानाचा आपल्या एकुलत्या एक मुलासह नगर जवळ कार अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी पहाटे घडली.

बाजीराव त्र्यंबक मिस्कर (वय ३८), साई (वय १२) हनुमान नगर, मनमाड असे मृत पिता पुत्राचे नाव आहे. भारतीय सैन्य दलात पंजाबमधील हिस्सार येथे कार्यरत असलेले जवान बाजीराव मिस्कर हे भावाच्या वर्षश्राध्दासाठी सुट्टीवर मनमाड येथे आले होते. नुकतेच त्यांच्या मेहुण्याचा विवाह झाला होता. आपल्या मुलासह स्वत:च्या अल्टो कारने रविवारी रात्रीमनमाड येथून जेजुरी येथे खंडोबाच्या दर्शनासाठी जात असताना काळाने या पिता पुत्रावर झडप घातली.अपघात इतका भीषण होता की त्यात कारचा चक्काचूर झाल्याने दोघा पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती कुटुंबियांना कळताच त्यांनी तातडीने नगरकडे धाव घेतली. या घटनेने शहर परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान मनमिळावू असलेले बाजीराव सर्वांना परिचित होते. ते सुट्टीवर आल्यानंतर सर्व नातेवाईक, मित्रमंडळींना भेटत होते. देवाला जाताना त्यांच्यावर काळाने क्रूर घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, भाऊ, दोन भावजयी असा परिवार आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
.