राज्यात ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता ३० जून पर्यंत प्रशासनातील कोणत्याही व्यक्तीची बदली होणार नाही. परंतु तातडीची बदली असल्यास मुख्यमंत्र्याच्या मान्यतेने अशी बदली करता येणार आहे. राज्य शासनाकडून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
”महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे निनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ नुसार करण्यात येणाऱ्या बदल्या २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षी ३० जून २०२२ पर्यंत करण्यात येऊ नयेत. परंतु, प्रशासकीय कारणास्तव तातडीने एखादी बदली करणे आवश्यक असल्यास अशी बदली मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने करावी, असे शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे.











