नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथील समर्थ मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये साहित्यकणा फाउंडेशनच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त पार पडलेल्या साहित्य संमेलनात संस्थेचे अध्यक्ष मा. संजय गोराडे व सचिव मा. विलास पंचभाई यांनी कवी काशिनाथ गवळी यांची साहित्यकणा फाउंडेशनच्या उपाध्यक्षपदी व सुरेश चौरे यांची खजिनदारपदी सर्वानुमते निवड झाल्याचे जाहीर केले. संमेलनाध्यक्ष राजनजी लाखे, संजय वाघ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून उपाध्यक्षपदी निवडीचे पत्र त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. कवी काशिनाथ गवळी यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान पाहून ही निवड केल्याचे सचिव विलास पंचभाई यांनी सांगितले. संस्थेचा प्रचार, प्रसार व नावारूपास आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे कवी काशिनाथ गवळी यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल प्रा. सुरेश नारायणे यांनी त्यांचे अभिनंदन केले . तसेच साहित्य क्षेत्रात त्यांचे अभिनंदन होत आहे.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











