loader image
[ays_poll id=7]

नवज्ञानाचा उपयोग महावितरणच्या विकासासाठी करावा : मुख्य अभियंता वादिराज जहागिरदार

Jun 1, 2022



महावितरणच्या माध्यमातून स्थापत्य अभियंता म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली आहे, त्याचसोबत प्रथमच दीर्घ कालावधीचे आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध माहिती व ज्ञान मिळाले असून, स्थापत्य अभियंत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात या नवज्ञानाचा उपयोग महावितरणच्या विकासासाठी करावा असे आवाहन स्थापत्य विभागाचे मुख्य अभियंता वादिराज जहागिरदार यांनी केले. महावितरणच्या एकलहरे येथील सुरक्षा व प्रशिक्षण केंद्र येथे आयोजित १८ एप्रिल ते ३१ मे २०२२ या सहा आठवड्याच्या महावितरणमधील स्थापत्य अभियंते यांच्या पहिल्या अभिक्रम आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर एकलहरे येथील सुरक्षा व प्रशिक्षण केंद्राचे मुख्य महाव्यवस्थापक देवेंद्र सायनेकर व कार्यकारी अभियंते नरेंद्र सोनवणे व निलेश चालिकवार उपस्थित होते.

महावितरण ग्राहकांना अखंडित सेवा देण्याचे कार्य करीत आहे, त्यामध्ये स्थापत्य विभागाकडून दर्जेदार कामे करण्याचे तथा कार्यामध्ये तडजोड न करता प्रामाणिकपणे आपली सेवा बजावून स्थापत्य विभागाची प्रतिमा उंचावण्याचे कार्य करा असेही मुख्य अभियंता वादिराज जहागिरदार यांनी सांगितले.

या प्रशिक्षणामधून सकारात्मक बाबी घेऊन आपण आपल्या कार्यक्षेत्रात पोहोचवल्या पाहिजे. आजच्या ताणतणावाच्या काळात आनंदाने प्रशिक्षण घेऊन दैनंदिन कार्य व कर्तव्याचा आनंद घेवून महावितरण व स्वतःचा नावलौकिक वाढविला पाहिजे अशी अपेक्षा मुख्य महाव्यवस्थापक देवेंद्र सायनेकर यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केली. सुरुवातीला प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षणा दरम्यान झालेल्या घडामोडीची तयार केलेली चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. नाशिक परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे, बळवंत गाडगीळ, प्रशिक्षणार्थी, व्यासपीठावरील मान्यवर यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद झाल्टे व सुरक्षा व प्रशिक्षण केंद्र येथील कर्मचारी व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षण समन्वयक अतिरिक्त कार्यकारी अभियंता कौस्तुभ आचार्य यांनी तर आभार प्रशिक्षणार्थी अभियंता प्रविण साबळे यांनी मानले.


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
.