मनमाड शहरातील प्रभाग क्र.३ मधील एफ.सी.आय.रोड परिसरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असून स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे.
काही दिवसांपूर्वी स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकारी यांना तक्रार केली असता नालेसफाई करण्यास सुरुवात केली गेली परंतु नाली मधील घाण व कचरा फक्त बाहेर काढून गटारी शेजारीच साठवला गेला.मात्र परवा झालेल्या पावसाने परत सर्व मैला,कचरा घाण गटारीमध्ये जमा झाली, सफाई कर्मचाऱ्यांना इतर प्रभागात शासकीय कार्यक्रम असल्याने जास्तीचा कर्मचारी वर्ग त्या प्रभागात पाठविण्यात आल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. याबाबत त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ही राष्ट्रवादी काँग्रेस चे अक्षय देशमुख आणि स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!
शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...











