केंद्रीय इंजीनियरिंग कारखाना मनमाड मध्ये ‘आक्रोश मोर्चाचे’ आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे कामगारांना जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले याप्रसंगी मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. कामगार सेक्रेटरी नितीन पवार वर्किंग चेअरमन महेन्द्र चौथमल, शाखेचे चेअरमन प्रकाश बोडखे यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करून पुढील मागण्या सादर्करण्यात आल्या व ह्या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली.
1)पुरणी पेन्शन बंद करा
2) नवीन वर्क ऑर्डर देण्यात यावी
3) वर्कशॉप मध्ये पिण्याच्या पाण्याचा तसेच मशिनसाठी लागणाऱ्या पाण्याची तरतूद करावी
4) वर्कशॉपमध्ये शेड लिकेजचे काम लवकर करण्यात यावे
5)डी ग्रुप च्या जागा भरण्यासाठी त्वरीत प्रयत्न करावे
6)ऑर्डर साठी वेळेवर मटेरियल मिळणेबाबत
7)नवीन शेड ची निर्मिती करण्यासाठी
8)नवीन उत्पादन मिळवण्यासाठी मागणी करण्यात आली
9)कामगारांच्या विविध सेफ्टी समस्यांवर चर्चा करण्यात आली याप्रसंगी चेअरमन प्रकाश बोडके सेक्रेटरी नितीन पवार, वर्किंग चेअरमन महेंद्र चोथमाल, हेडक्वार्टर कमिटी मेंबर एकनाथ पाटील,खजिनदार मुक्तार शेख,व्हा चेअरमन गौतम वाघ, व्हा चेअरमन गणेश हडपे असिसेक्रेटरी हेमंत सांगळे, युवा चेअरमन वैभव कापडे, युवा वर्किंग चेअरमन अरुण कलवर,युवा संघटक शुभम माळवतकर,प्रशांत ठोके, नागेंद्र शुक्ला, सुनिल शिंदे,सोमनाथ सणस, बलराज तगारे, रमेश सिन्ना, स्वनिल महाजन, योगेश महाजन, असिफ खान, अमोल साळवे, वाल्मीक बाविस्कर, अमोल खाडे, सचिन साळुके, नंदू कदम,दिपक बोरसे, योगेश शेरेकर,इच्छाराम माळी, हेमंत माळी, राम आहेर, सागर हाडपे आदी उपस्थित होते.












