मनमाड रेल्वे स्थानकातून फुकट्या प्रवाशांकडून एक लाख ८१ हजार २६० रुपये वसूल करण्यात आले विना तिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्या ५९०० प्रवाशांकडून वाणिज्य विभाग आणि रेल्वे सुरक्षा बल यांनी केलेल्या कारवाईत एका दिवसात ४० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सर्व स्थानकांवर आणि प्रवाशी गाड्यांमधील विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध एकदिवसीय तपासणी मोहीम राबविण्यात आली.मुंबई,पुणे,औरंगाबाद, नागपूर आदी विविध भागातून येणाऱ्या गाड्यांमधून उतरणाऱ्या प्रवाशांवर धाड पाडल्यामुळे प्रवाशांचे चांगलेच धाबे दणाणले.भुसावळ विभागाचे रेल्वे प्रबंधक एस.एस.केडिया यांच्या अध्यक्षतेखाली व भुसावळ विभागाचे मुख्य विभागीय वाणिज्य प्रबंधक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम राबविण्यात आली.
“सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प” ठरतोय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन
शेतीसाठी वाढता खर्च उत्पन्नाची शाश्वती नसणे बाजारभावाची हमी नसणे गारपीट यासारख्या अनेक प्रकारच्या...










