मनमाड आठवडे बाजार परिसरात आज पुन्हा गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने परिसरातील पूर्ण बाजारपेठेत पाणी शिरल्याने दुकानदारांची व नागरिकांची तारांबळ उडाली याच भागात नेहमी विद्यार्थी, महिला,ज्येष्ठ नागरिक यांना फार त्रास होत असतो तरी नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या भागातील चोकब झालेल्या गटारी व फुटलेल्या नळाचे पाईप त्वरित दुरुस्त करावे अशी मागणी फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे कार्याध्यक्ष फिरोज शेख यांनी केली आहे.













