अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर केंद्र शासनाकडून 5% जीएसटी लागू होणार असल्याबाबतचा अंतिम निर्णय जीएसटी कौन्सिलमध्ये घेतल्याचे समजते आहे. सदरबाबतचे नोटीफिकेशन दि. 13 जुलै 2022 रोजी काढलेला आहे. केंद्र सरकारने अन्नधान्य, खाद्यान्न व जीवनावश्यक वस्तूंवर 5% जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकरी, छोटे व्यापारी आणि पर्यायाने सामान्य जनतेला बसणार आहे. त्यामुळे महागाई अजूनच वाढून सर्वसामान्य जनता यात भरडली जाणार आहे.
जी.एस.टी. मध्ये अन्नधान्य, गुळ, कडधान्य या वस्तूंचा समावेश केला आहे. सदर जीएसटी दि. 18 जुलै 2022 पासून लागू होणार आहे. याबाबत चेंबर ऑफ कॉमर्स ने देशव्यापी बंद शनिवार दि. 16 जुलै 2022 रोजी पुकारला आहे. त्यामध्ये मनमाड येथिल किराणा व्यापारी असोसिएशन, अन्न धान्य व्यापारी हे सहभागी होणार आहे.
त्यांच्या या मागणीला मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत. शिवसेना ही सदैव सामान्य जनतेच्या सोबत आहे.
या निर्णयाचा शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत.
केंद्र सरकारने हा अन्यायकारक व मॉल संस्कृती च्या हितासाठी घेतलेला निर्णय त्वरीत मागे घ्यावा अन्यथा व्यापारी, शेतकरी व जनतेसाठी शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे यांनी दिला आहे.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











