मोरझर, आझाद नगर ( पिंजारवाडी) येथील नागरिक, शालेय विद्यार्थी, शेतकरी बंधू भगिनी हे भोसले वाडा ते नांदगाव रोड ह्या जिल्हापरिषद रोड पासून रेल्वे लगत दक्षिणेला असलेल्या जागेचा वापर रहदारी साठी करत आहेत. पावसामुळे ह्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून नांदगाव ला जाण्यासाठी येथील नागरिकांना, शेतकरी बांधवांना व शालेय विद्यार्थ्यांना पर्यायी मार्गच नसल्याने ह्या सर्वांचे अतोनात हाल होत आहे. रेल्वे विभागाच्या तिसऱ्या लाईन मुळे आता रस्ताच शिल्लक राहिलेला नसून १५ दिवसात मोरझर, आझाद नगर वासियांना पर्यायी रस्ता जोडून देण्यात यावा अशी मागणी सरोदे वस्ती येथील तकदिर पूंजाबा सरोदे यांनी दिंडोरी लोकसभेच्या खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना. भारती ताई पवार यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. येत्या १५ दिवसात रस्त्याचा प्रश्न न सुटल्यास सरोदे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला असून होणाऱ्या सर्व परिणामांना प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











