मनमाड – राज्य सरकारने सादर केलेला बांठीया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारत ओबीसी चे आरक्षण पूर्ववत करण्याच्या न्यायालयाचे निर्णयाचे शिवसेनेचे नवनिर्वाचित संपर्क प्रमुख जयंत दींडे यांनी स्वागत केले आहे. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे उद्या मनमाड येथे सकाळी ११ वाजता संवाद यात्रा घेणार असून त्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची बैठक मनमाड येथे पार पडली. या बैठकीला जयंत दिंडे यांसह सह संपर्क प्रमुख अल्ताफ खान, माजी आमदार राजेंद्र देशमुख,जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, जिल्हा उप प्रमुख संतोष बलिड,शहर प्रमुख मयूर बोरसे, कैलास गवळी,प्रमोद पाचोरकर,संजय कटारिया, इरफान मोमीन,सुधाकर मोरे, अनिल दराडे,शैलेश सोनवणे, अंकुश गवळी, सनी फसाटे, विकी सुरवसे,अनिल दराडे,रवी अमराले, अशोक सानप आदी उपस्थित होते.
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!
शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...











