शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व अशा बंडाळीनंतर ४० आमदार आणि १२ खासदार शिंदे गटात सामील झाल्याने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बंडाळी झालेल्या मतदार संघामध्ये शिवसंवाद यात्रेचे आयोजन करत निष्ठावान शिवसैनिक कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे कार्य हाती घेतले असून त्या पार्श्वभूमीवर आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मनमाड शहरात सकाळी ११ वाजता शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून येथील साई प्रसन्न लॉन्स येथे मार्गदर्शन करणार आहेत. याच मेळाव्यात नांदगाव चे आमदार सुहास कांदे हे आपल्या कार्यकर्त्यांसह आदित्य ठाकरे यांना विविध प्रश्नांसंदर्भात निवेदन देणार असल्याचे गुरुवारी रात्री उशिरा काढलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. आमदार कांदे यांच्या या भूमिकेमुळे ठाकरे – कांदे समोरासमोर येतात की काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प” ठरतोय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन
शेतीसाठी वाढता खर्च उत्पन्नाची शाश्वती नसणे बाजारभावाची हमी नसणे गारपीट यासारख्या अनेक प्रकारच्या...










