भारतीय स्वांतत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त मनमाड शहरात असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यास रंगरंगोटी,विद्युत रोशनाई व पुतळयाच्या परिसरात स्वच्छता करणेबाबत मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांच्याकडे कामगार नेते बळवंत आव्हाड यांनी मागणी केली आहे.
भारताला स्वांतत्र मिळुन ७५ वर्ष पुर्ण होत आहे.त्या निम्मिताने केंद्रात आणि राज्यात हा ७५ वा अमृतमोहत्सव सर्वत्र साजरा केला जात आहे. म्हणुन मनमाड शहरात असलेल्या महापुरुषांच्याच्या पुतळयास रंगरंगोटी,विद्युत रोशनाई नगरपरिषदच्या माध्यमातुन व्हावी.त्याचप्रमाणे मनमाड शहरामध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिक भारतीय स्वांतत्र्यांच्या लढयात सहभागी होते.अनेकाना भारत सरकार कडुन राज्य सरकारच्या माध्यमातुन तांम्रपट दिलेले आहे.तसेच भुमिगत आणि शिक्षा झालेल्या स्वांतत्र सौनिकाच्या आज रोजी हयात असलेले त्याच्या कुटुंबातील व्यक्तीचा या ७५ वा अमृतमोहत्सव निमित स्वांतत्र्याची आठवण म्हणुन सत्कार समारंभ अयोजित करावा. त्याचप्रमाणे स्वांतत्र सैनिकाची यादी महात्मागांधी याच्या पुतळ्या जवळ प्रसिध्द केलेली आहे याची नोंद घ्यावी . ” मनमाड नगरपरिषद प्रशासन अधिकारी म्हणुन आपण यास प्राधान्य दयावे, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











