वडगाव पंगु परिसरात पावसाचा हाहाकार गेल्या 15 दिवसापासून सातत्याने पडणाऱ्या आणि आज झालेल्या तुफान पावसाने आज गावच्या पुलावरून 6 फूट उंच पाणी वाहूनहनुमान वाडी आणि भडाणे परिसरात शेती पिकांचे नुकसान झाले. शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असून शासनाने त्वरित पंचनामे करावेत अशी मागणी परिसरात शेतकऱ्यांनी केली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती ताई पवार ,या तालुक्याचे आमदार राहुल दादा आहेर, डॉ आत्माराम कुंभार्डे तहसिलदार पाटील कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी यांनी तातडीने परिसरातील शेतकरी बांधवांना शासन स्तरावर मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे तसेच गेट नंबर १११ अंडर बायपास या संदर्भातील मागणीसाठी कातरवाडी आणि वडगाव येथील नागरिक लवकरच केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांची लवकरच भेट घेणार आहे .
*मनमाड महाविद्यालयात वंदे मातरम गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन*
मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड...








