मनमाड : समस्त मनमाडकरांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे मनमाडकरांचे पाण्याची जीवन वाहिनी असणारे वागदर्डी धरण हे सलग चौथ्या वर्षी धरण क्षेत्रात झालेल्या चांगल्या पावसाने आज ओव्हरफ्लो होऊन धरणाच्या सांडव्या वरून पाणी वाहण्यास सुरवात झाली आहे.
धरणास मिळणारे नदी-नाल्याचे पाणी हे सतत चालु असल्याने येणाऱ्या दिवसांमध्ये धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊन धरणावरील सांडव्या वरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू शकते.आज धरणामध्ये 68.2 फुटा पर्यंत पाणी साठा असुन , धरणाच्या क्षमतेनुसार 110 दश लक्ष घन फुट इतका पाणीसाठा उपलब्ध आहे












