loader image
[ays_poll id=7]

स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव वर्षा निमित्त नांदगाव कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन

Aug 15, 2022


नांदगाव: शहरातील म. वि.प्र.समाजाचे, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संस्मरणीय बनावा यासाठी महाविद्यालयाच्या वतीने व वनविभाग नांदगाव यांच्या सहकार्याने हर घर तिरंगा रॅली आयोजित केली होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग ,विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा जागर, तसेच हर घर तिरंगा या योजने अंतर्गत आपणास प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरामध्ये तिरंगा फडकवायचा आहे, या उपक्रमांतर्गत ही रॅली महाविद्यालयापासून ते हुतात्मा स्तंभापर्यंत पार पडली. सदर कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयात विद्यार्थी केंद्रित कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थी सहभागी व्हावा यादृष्टीने प्रयत्न करण्यात आले.
या सर्व उपक्रमांचा आढावा विशद करतांना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस ए मराठे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव का साजरा केला जात आहे. यावर प्रकाश टाकला. ‘तिरंगा’ आपल्या देशाचा अभिमान व सन्मान आहे. आपला राष्ट्रध्वज आपल्यासाठी धैर्याचे व प्रेरणेचे प्रतीक आहे. तिरंगा आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘हर घर तिरंगा ही मोहिम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम प्रत्येक भारतीयाने त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकविण्याची प्रेरणा देते. लोकांच्या हृदयात देशभक्ति जागृत करणे, आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढविणे हा ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हे स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या आयोजनामध्ये स्वातंत्र्य लढयाची भावना व त्याग अनुभवता येणार आहे. देशातील सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली व अभिवादन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. असे सर्व उपक्रम आपल्याला प्रेरणादायी ठरणार आहेत. तरी सर्व पालक, विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी व समाजातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन हे कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य आर.टी.देवरे ,प्रा.आर.एल.दिवटे, प्रा पी.टी.निकम, प्रा.पी.एन.जपे.प्रा.बी.के.पवार,प्रा. फाकटकर,प्रा.पी.एम आहेर,प्रा.पी.के.कुलकर्णी,प्रा.जे. एच.देवरे.प्रा.वडजे,प्रा.जे.एस.शेख,श्रीमती जान्हवी म्हस्के , स्नेहल शेवरे,सुवर्णा लोखंडे, रेश्मा बरकले ,सुषमा पाटील व सर्व महाविद्यालयीन सेवक वर्ग यांनी केले. विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ.अतुल मदने आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अधिकारी बालाजी मोरे,प्रा. डी.आर. बच्छाव यांनी विशेष परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
.