मनमाड – गेल्या पन्नास वर्षापासून अमन आणि शांतीसाठी सद्भावना पदयात्रेद्वारे देशातील जनतेला मतदान करा, शिक्षित व्हा तसेच कोरोना काळात लसी बाबत माहिती तसेच मास्क लावा आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व देशभक्तांना श्रद्धांजली अर्पित करणारे बॅनर व मोठी ढोलकी हातात घेऊन वाजवीत निस्वार्थपणे लक्ष्मण नामदेव गणवीर यांनी गेल्या 50 वर्षांमध्ये 35 वेळा इंदोर ते शिर्डी पायी पदयात्रा करीत जनजागृती करीत आहे.
आज मनमाड येवला रोडवरील साधना ज्यूस सेंटर येथे त्यांनी विश्रांती घेतली असता त्यांना साधना ज्यूस सेंटर तर्फे चहा पाणी देऊन त्यांची विचारपूस करण्यात आली. त्यांनी आपण गेल्या 50 वर्षात 35 वेळा पायी इंदोर शिर्डी प्रवास करीत असल्याचे सांगितले तसेच ही 35 वी इंदोर ते मनमाड पायी पदयात्रा असल्याचे सांगत इंदोर ते मनमाड आज येण्यास सात महिन्यांचा कालावधी लागला असल्याचे सांगितले. उपस्थित नागरिकांनी त्यांची आस्थेवाईक पणे विचारपूस करत त्यांच्या ह्या कार्याला शुभेच्छा देऊन तब्ब्येतीची काळजी घेण्याची विनंती केली.












