राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कालच्या पाचव्या दिवशी नांदगाव चे आमदार सुहास कांदे यांनी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाची चौकशी प्रकरणी प्रश्न उपस्थित केले. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली, पण तरीही कांदे आक्रमक होते. यावेळी बोलताना सुहास कांदे यांनी थेट, ‘तुम्ही आमच्या उद्धव साहेबांना ब्लॅकमेल केले’ असे विधान केले. कांदेंचे या विधानाने ते सध्या चर्चेत आले आहे.
छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांचा वाद राज्यात सर्वश्रुत आहे. राज्यात महाविकास महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून त्यांचा वाद सुरू आहे. त्यावेळी हा वाद थेट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचला होता. त्यात ठाकरेंनी हस्तक्षेप करून तो वाद काही अंशी मिटवला होता. मात्र, आज विधीमंडळाच्या सभागृहात पुन्हा हा वाद उफाळून आला. सभागृहात आज महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी कांदे आक्रमक झाले, त्यांच्या प्रश्नांची उत्तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. मात्र, तरीही त्यांचा राग काही कमी झाला नव्हता, त्यानंतर त्यांनी तुम्ही आमच्या उद्धव साहेबांना ब्लॅकमेल केले, असे विधान केले आहे.
महाराष्ट्र सदन प्रकरणात मविआने छगन भुजबळ यांना क्लिन चीट देण्यात आली असून, आज पुन्हा कांदे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरानंतर समाधान न झाल्याने ‘अहो फडणवीस साहेब, असं काय करताय..? तुमच्याकडे बघून तर आम्ही इकडे आलोय…’, असेही आमदार कांदे म्हणाले.
राशीभविष्य : १५ ऑक्टोबर २०२५ – बुधवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....






