मनमाड(प्रतिनिधी)- पुढील रविवारी म्हणजे ४ सप्टेंबर रोजी येथे बरखा कविता उत्सव होणार असून मनमाड जनहित विकास संस्था,कलाक्षर साहित्य रसिक मंच व साहित्याक्षर प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आय.यु.डि.पी.तील महात्मा जोतीराव फुले अभ्यासिका सभागृहात संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत एकाच मंचावरुन दोन कार्यक्रमांचा आस्वाद काव्यरसिकांना घेता येणार आहे,पहिल्या सत्रात स.१०-००वा. ‘कवी समजून घेतांना..’ या संवादात्मक कार्यक्रमात ज्येष्ठ कवयित्री डाॕ.राजश्री देशपांडे(सातारा)यांच्यांशी काव्यगप्पा होतील तर दुपारी २-०० वा.होणा-या ‘बरखा कविता उत्सव’या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत व नवोदीत युवा कवींच्या ‘पाऊसकविता’काव्यरसिकांना अनुभवता येणार आहेत.
डाॕ.राजश्री देशपांडे या मनोविकारतज्ज्ञही असून श्रोत्यांच्या काव्यविषयक व मनोव्यापारविषयक प्रश्नांना त्या उत्तरे देतील.साहित्यिक डाॕ.संजय बोरुडे हे या कार्यक्रमाचे सूत्रसंवादक असतील.
तरी या दोनही कार्यक्रमाचा आस्वाद साहित्यरसिकांनी घ्यावा असे आवाहन मनमाड जनहित विकास संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार श्री.अशोकआप्पा परदेशी, साहित्याक्षर प्रकाशनाच्या सौ.क्रांती राऊत ,समन्वयक रचना व कलाक्षरचे निमंत्रक साहित्यिक जनार्दन देवरे यांनी केले आहे.
या कविता उत्सवात उपस्थित काव्यरसिकांनाही आपली ‘पाऊसकविता’सादर करावयाची संधी मिळणार आहे.सहभागी कवींना बरखा कविता उत्सव सन्मानचिन्ह दिले जाणार आहे.यासाठी कवींनी ९३२६६६७५८० , ७०४०२३९९७० व ९८५०९७२४२६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही संयोजकांनी केले आहे.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











