ऐन गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मनमाड शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत थेट एफ सी आय रोड येथील महावितरण च्या कार्यालयात धडक देत जाब विचारला. शहरात होणारा खंडित वीजपुरवठा ही नित्याचीच बाब झाली असून महावितरणच्या ह्या कारभाराला जनता विटली आहे.पावसाळा सुरू होण्याअगोदर मोठ्या प्रमाणात वीजवाहक तारांच्या कामासाठी ८ ते १० तास वीज पुरवठा खंडित करणाऱ्या महावितरण ला अखंडितपणे वीज पुरवठा का करता येत नाही? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. विचारणा करण्यास दूरध्वनी क्रमांकावर फोन केल्यास उडवा उडवीची उत्तरे नागरिकांना दिली जातात तर बऱ्याच वेळा रिसिवर बाजूला ठेवला जातो. काल सायंकाळ पासून आय यु डी पी भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने दोस्ती गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालय गाठत जाब विचारला.संबंधित अधिकाऱ्यांनी मोबाईल बंद केल्याने कार्यकर्त्यानी तीव्र नाराजी व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या. दूरध्वनी क्रमांकावर जर वीज ग्राहकाच्या शंकेचे तसेच तक्रारीचे निवारण होणार नसेल तर तो दूरध्वनी संच काय कामाचा ? असा सवाल युवा सेनेचे अमोल दांडगव्हाळ यांनी उपस्थित केला असून महा वितरण ने आपल्या कामकाजात बदल न केल्यास कार्यालयातील दूरध्वनी संचच फोडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!
शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...











