loader image
[ays_poll id=7]

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

Sep 7, 2022


राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांतील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.निवडणूक आयोगाने निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याचे सांगितले आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी १४ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी सांगितले. यंदा सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

संबंधित तालुक्याचे तहसीलदार १३ सप्टेंबर रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज २१ ते २७ सप्टेंबर दरम्यान दाखल करता येतील.
२४ आणि २५ सप्टेंबर रोजी शनिवार-रविवार सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार नाही.
प्राप्त अर्जांची छाननी २८ सप्टेंबर रोजी करण्यात येईल.
३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. त्याचदिवशी निवडणूक चिन्हांचेही वाटप होईल.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान होणार आहे.
दुसऱ्या दिवशी 14 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची ११०मी हर्डल्स विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची ११०मी हर्डल्स विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
शाळकरी विद्यार्थ्यांची शैक्षणिक नोंदी येणार ‘अपार’ आयडीत – केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय

शाळकरी विद्यार्थ्यांची शैक्षणिक नोंदी येणार ‘अपार’ आयडीत – केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय

केंद्रातील सरकार देशभरातील शालेय विद्यार्थ्यांचा डेटा गोळा करीत आहे. देशभरातील शालेय...

read more
छत्रे विद्यालयाच्या नऊ खेळाडूंची शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

छत्रे विद्यालयाच्या नऊ खेळाडूंची शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक व छत्रे विद्यालय आयोजित नाशिक...

read more
नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी पुकारला संप – बळीराजा समोर मोठे संकट

नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी पुकारला संप – बळीराजा समोर मोठे संकट

मनमाड -नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्या वसमस्यांवर काल झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या...

read more
आधार कार्ड,पासपोर्ट सह विविध कामांसाठी जन्म दाखल्याचा एकल दस्तऐवज म्हणून होणार वापर – १ ऑक्टोंबर पासून होणार अंमलबजावणी

आधार कार्ड,पासपोर्ट सह विविध कामांसाठी जन्म दाखल्याचा एकल दस्तऐवज म्हणून होणार वापर – १ ऑक्टोंबर पासून होणार अंमलबजावणी

आधार कार्ड, पासपोर्ट असो अथवा शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा विवाहनोंदणी...

read more
.