loader image
[ays_poll id=7]

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

Sep 7, 2022


राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांतील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.निवडणूक आयोगाने निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याचे सांगितले आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी १४ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी सांगितले. यंदा सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

संबंधित तालुक्याचे तहसीलदार १३ सप्टेंबर रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज २१ ते २७ सप्टेंबर दरम्यान दाखल करता येतील.
२४ आणि २५ सप्टेंबर रोजी शनिवार-रविवार सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार नाही.
प्राप्त अर्जांची छाननी २८ सप्टेंबर रोजी करण्यात येईल.
३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. त्याचदिवशी निवडणूक चिन्हांचेही वाटप होईल.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान होणार आहे.
दुसऱ्या दिवशी 14 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
.