एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२. पोषण माह २०२२ मध्ये अंगणवाडीत ताईनी विविध स्पर्धा आयोजित केल्या ,त्यात महिला, किशोरी यांनी रांगोळी काढुन त्या व्दारे विविध महत्वपुर्ण संदेश दिले.त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ताईने त्यांना मुख्यसेविकाच्या हस्ते बक्षिसे वाटप करुन त्याच्यां कामाचे कौतुक ही केले.. अंगणवाडी ताईने ही कार्यक्रमाचे आयोजन करत विविध रांगोळी काढल्या. या रांगोळीत विविध भाज्या,कडधान्य,फळे,इतर ही वस्तुंचा वापर करून काढल्या तर शिक्षणाचे,पाण्याचे,मुलगी वाचवा,आहाराचे महत्व,इतरही संदेश दिले.

कुपोषण हटविण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात पारंपारिक खाद्यपदार्थाचा आहारात वापर करायचा आहे. हा पारंपारिक आहार आपल्या पोषणासाठी कसा योग्य आहे. ह्याचे महत्व पटवुन दिले.त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यन्त पोषणाचा योग्य संदेश पोहोचविणे व त्याव्दारे पोषणाचे वर्तनात बदल घडवुन आणणे हे अभिप्रेत आहे..












