loader image
[ays_poll id=7]

अन्यथा मनमाड चे ज्येष्ठ नागरिक करणार आमरण उपोषण

Sep 13, 2022


मनमाडकर नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा बाबत ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीच्या आंदोलनाचा आज दुसऱ्या दिवशी ही नगरपालिका प्रशासनाने दखल घेतली नसून उडवा उडवी ची उत्तरे देऊन समितीची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. दिनांक १२ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर धरणे आंदोलन असून १५ सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. शहरातील नागरिकांच्या सोयीसुविधा बाबत जो पर्यंत युद्धपातळीवर नगर पालिका प्रशासन निर्णय घेत नाही तो पर्यंत ” मरो या तरो ” असा ठाम निर्णय अध्यक्ष राजाभाऊ पारीक, नरेंद्र कांबळे,दिलीप आव्हाड,एस.एम. भाले यांनी घेतला आहे.आंदोलनात पांडुरंग पगारे,रामभाऊ गवळी, श्रीकांत साळसकर, आर. बी धेंगळे,गोपीनाथ गायकवाड आदी उपस्थित होते. आज आंदोलनाला प्रामुख्याने पाठिंबा दर्शविणाऱ्या काँग्रेस चे अशोक व्यव्हारे, आर पी आय चे राजेंद्र आहिरे, गंगा दादा त्रिभुवन, आर.पी. निळे,सुरेश शिंदे, किसान सभा जिल्हा सचिव विजय दराडे, अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायत प्रदेश सचिव प्रकाश चावरीया,प्रदेश संघटक बबलू लोहरे, राष्ट्रवादी सेवादल अध्यक्ष राजाभाऊ जाधव यांनी पाठिंबा दर्शविला.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
.