मनमाडकर नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा बाबत ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीच्या आंदोलनाचा आज दुसऱ्या दिवशी ही नगरपालिका प्रशासनाने दखल घेतली नसून उडवा उडवी ची उत्तरे देऊन समितीची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. दिनांक १२ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर धरणे आंदोलन असून १५ सप्टेंबर पासून ज्येष्ठ नागरिक आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. शहरातील नागरिकांच्या सोयीसुविधा बाबत जो पर्यंत युद्धपातळीवर नगर पालिका प्रशासन निर्णय घेत नाही तो पर्यंत ” मरो या तरो ” असा ठाम निर्णय अध्यक्ष राजाभाऊ पारीक, नरेंद्र कांबळे,दिलीप आव्हाड,एस.एम. भाले यांनी घेतला आहे.आंदोलनात पांडुरंग पगारे,रामभाऊ गवळी, श्रीकांत साळसकर, आर. बी धेंगळे,गोपीनाथ गायकवाड आदी उपस्थित होते. आज आंदोलनाला प्रामुख्याने पाठिंबा दर्शविणाऱ्या काँग्रेस चे अशोक व्यव्हारे, आर पी आय चे राजेंद्र आहिरे, गंगा दादा त्रिभुवन, आर.पी. निळे,सुरेश शिंदे, किसान सभा जिल्हा सचिव विजय दराडे, अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायत प्रदेश सचिव प्रकाश चावरीया,प्रदेश संघटक बबलू लोहरे, राष्ट्रवादी सेवादल अध्यक्ष राजाभाऊ जाधव यांनी पाठिंबा दर्शविला.
मनमाड महाविद्यालयात जिल्हास्तरीय पर्यावरण संवर्धन कार्यशाळा संपन्न
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड व राष्ट्रीय सेवा योजना...











