एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक – २. अंगणवाडी क्र. ६८. मनमाड विभाग येथील सेविकाताई वैशाली कातकाडे ,रंजना कातकाडे मदतनिस ताई यांनी १ ते ३० सप्टेंबर २०२२ या अनुशंगाने संत बार्णबा शाळेतील शिक्षक वर्ग याच्यां सहकार्याने पोषण माहच्या चार थीमनुसार निबंध स्पर्धा आयोजित केली.निबंध स्पर्धेत २९ विद्यार्थ्यानी उत्स्फुर्तपणे भाग घेतला यामुळे मुलांच्या कला गुणांना वाव मिळाला तसेच त्यांचे मत मांडता आले. श्री.कराड सर व श्री.गरुड सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.खरं तर नाविन्यपुर्ण विषय असुन देखील मोठ्या उस्फुर्तपणे विद्यार्थ्यानी सहभाग नोदंविला,शिक्षकांनी ही या उपक्रमाचे केले कौतुक – शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२.
वात्रटिका हे टीका करण्याचे उत्तम साधन – कवी हेमंत वाले
नाशिक (प्रतिनिधी) प्रत्येक व्यक्ती डोळसपणे समाजाकडे बघत असतो. दैनंदिन जीवन व्यवहारात वावरत असताना...











