रविवारी आणि सोमवरी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातून वाहणाऱ्या रामगुळणा – पांझण नदीला पुर आल्याने नदी काठी वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले. काल पूरस्थितीची पाहणी शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक आणि मनमाड शहर शिवसेनेच्या पदाधिकांऱ्यानी केली. पूरग्रस्थानां समक्ष भेटून त्यांची विचारपूस करीत अत्यावश्यक वस्तू ,किराणा सामान वाटप करण्यात आले.
महापुराच्या पार्श्वभूमीवर पुढील काळातील संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी नगरपरीषद प्रशासनाने नदीकाठी असलेला मलबा दोन्ही बाजूने काढून घेण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी प्रशासनाला केले, प्रशासनाने हे काम न केल्यास मनमाड शहर शिवसेना स्वखर्चाने हे काम हाती घेईल.तसेच शासनाने नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करावी.असे गणेश धात्रक यांनी पत्रकाराशी बोलतांना सांगीतले.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, प्रमोद पाचोरकर,कैलास भाबड, पंडीत सानप , सुभाष दरगुडे , कैलास गवळी, लियाकत शेख , संतोष जगताप, शैलेश सोनवने, संजय कटरीया, मुराद शेख, इरफान शेख , मुक्ताबाई नलावडे , रेणुका जयस्वाल , किरण शिंदे , अंकुश गवळी,लिलाबाई राऊत, दिनेश केकाण, स्वराज देशमुख,जावेद मन्सूरी,आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












