जाहिर सुचना
मनमाड शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.
शहराला पाणी पुरवठा करणा-या वागदर्डी धरणाचा सांडवा वैगेरे फुटलेला नाही. व धरण क्षेत्रात कोणत्याही प्रकारची हानी देखिल झालेली नसून धरण क्षेत्रातील पश्चिम बाजुकडील गावाकडे अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला आहे. त्यां नद्यांचे पाणी धरण क्षेत्रात येत असल्याने सांडव्यातून हे पाणी जोरात वाहत आहे.
तरी सर्व नागरिकांनी यावर विश्वास ठेवावा. कोणत्याही खोट्या बातम्या व अफवांना बळी पडू नये. अशा अनाधिकृत बातम्या प्रसारीत करू नये. असे झाल्यास किंवा कोणी खोटी माहिती प्रसारित केल्यास अशा नागरिकांविरुद्ध फौजदारी अथवा योग्य ती कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. असे आवाहन मनमाड नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल यांनी केले आहे.












