आधीच जास्त पडणाऱ्या पावसामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी आता जनावरांना कोणत्या तरी संसर्गाने ग्रासले असून यात लंपी या विषाणुजन्य आजाराचा संशय व्यक्त केला जात असला तरी मात्र पशुधन मालक चिंतेत सापडला असून पानेवाडी येथील दोन शेतकऱ्यांच्या दोन गायी एक वासरु अशा तीन जनावरे अचानक मरण पावल्याने ते संकटात सापडले आहे.
येथून जवळच असलेल्या पानेवाडी येथील नवनाथ वाळूबा सांगळे यांची नऊ महिन्याची गाभन गाय अचानक मरण पावली.तर सुरेश कांदळकर यांची एक गाय आणि वासरु यांचा ही मृत्यु झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.दरम्यान बेजगाव,एकवई,नागापुर आदि भागातील गांवामध्ये गायी,म्हशी जनावरे असून त्यामुळे दुग्ध व्यवसाय आहे.मात्र जनावरावर लंपी सारखा आजार आल्याने सदर जनावरे मृत्युमुखी पडत असल्याने अनेक शंका उपलब्ध केल्या जात आहे.
तर या आजारामुळे अचानक जनावरे मृत्युमुखी पडत असल्याने पशुधन मालकांनी चिंता व्यक्त केली आहे.त्यामुळे या आजाराबाबत पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत गावोगावी जाऊन जनावरांची तपासणी करून उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांसह पशुधन मालकांनी केली आहे.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











