loader image
[ays_poll id=7]

पानेवाडी येथे जनावरांच्या मृत्यूने खळबळ ; बळीराजा धास्तावला

Sep 22, 2022


आधीच जास्त पडणाऱ्या पावसामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी आता जनावरांना कोणत्या तरी संसर्गाने ग्रासले असून यात लंपी या विषाणुजन्य आजाराचा संशय व्यक्त केला जात असला तरी मात्र पशुधन मालक चिंतेत सापडला असून पानेवाडी येथील दोन शेतकऱ्यांच्या दोन गायी एक वासरु अशा तीन जनावरे अचानक मरण पावल्याने ते संकटात सापडले आहे.
येथून जवळच असलेल्या पानेवाडी येथील नवनाथ वाळूबा सांगळे यांची नऊ महिन्याची गाभन गाय अचानक मरण पावली.तर सुरेश कांदळकर यांची एक गाय आणि वासरु यांचा ही मृत्यु झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.दरम्यान बेजगाव,एकवई,नागापुर आदि भागातील गांवामध्ये गायी,म्हशी जनावरे असून त्यामुळे दुग्ध व्यवसाय आहे.मात्र जनावरावर लंपी सारखा आजार आल्याने सदर जनावरे मृत्युमुखी पडत असल्याने अनेक शंका उपलब्ध केल्या जात आहे.
तर या आजारामुळे अचानक जनावरे मृत्युमुखी पडत असल्याने पशुधन मालकांनी चिंता व्यक्त केली आहे.त्यामुळे या आजाराबाबत पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत गावोगावी जाऊन जनावरांची तपासणी करून उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांसह पशुधन मालकांनी केली आहे.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.