loader image
[ays_poll id=7]

विद्यार्थी ३०२ अन् शिकवण्यासाठी शिक्षक फक्त ३

Sep 26, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालुक्यातील बोलठाण जिल्हा परिषद शाळेत एकूण ८ शिक्षक होते.आंतरजिल्हा बदलीने मूळ ४ शिक्षकांची बदली झाल्याने व १ शिक्षक अगोदरच बदली होवून गेल्याने बोलठाण जिल्हा परिषद शाळेत ३०२ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी फक्त ३ शिक्षक आहे.मुळात शाळेत पहिले ८ होते .आंतरजिल्हा बदली ने ४ व अगोदर १ शिक्षक बदलून गेल्याने असे एकूण ५ शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक चिंतेत आहे.
बोलठाण जिल्हा परिषद शाळा ही घाटमाथ्यावरील मोठी शाळा असून विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त आहे.४० विद्यार्थ्यांना १ शिक्षक या प्रमाणे ९ शिक्षक व १ हेडमास्तर असे एकूण १० शिक्षक आवश्यक असतांना आज रोजी फक्त ३ शिक्षक व १ हेडमास्तर आहे.पर्यायाने विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होत आहे.एकावेळी ४ शिक्षक बदली झाल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.शिक्षक तात्काळ मिळावे यासाठी शालेय व्यवस्थापन समिती तर्फे मुख्याध्यापक यांना निवेदन ही देण्यात आले आहे.
बोलठाण जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी वर्ग असून प्रत्येक वर्गच्या २ तुकड्या होऊन ८ वर्ग होतात.शाळेचा शैक्षणिक दर्जा ही उत्तम असल्याने पालक वर्ग मुलांच्या प्रवेशासाठी आग्रही असतात.गेल्या १ महिन्यापासून शिक्षक बदली झाल्यापासून अजून पर्यंत शिक्षक नसल्याने पालक वर्गात संताप दिसून येतो. तरी शासनाने तात्काळ शिक्षक देऊन होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी पालक करत आहे.

प्रतिक्रिया
प्रितेश नहार
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष

आधीच कोरोना मुळे मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान झालेले आहे आत्ता कुठं शैक्षणिक घडी बसण्यास सुरवात झाली होती त्यात शिक्षक बदली मूळ पुन्हा मुलांचे नुकसान होत आहे याकडे गांभीर्याने लक्ष देत तात्काळ शिक्षक दयावे व शैक्षणिक नुकसान टाळावे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
.