मनमाड शहराचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांची आज नाशिक येथे झालेल्या आर.पी.आय. आठवले गटाच्या जिल्हा बैठकीत जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आर.पी.आय. चे नेते प्रकाश लोंढे यांनी ह्या बैठकीत राजाभाऊ आहिरें यांच्या निवडीची घोषणा केली.
ह्या निवडीचे सर्व थरातून स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.















