चांदवड : आज आसरखेडे, देणेवाडी, मतेवाडी,मंगरूळ येथे जोरदार वारा व गारांचा पाऊस व गारपीट मुळे आसरखेडे येथील राहुल साबळे यांच्या कांद्याच्या शेतात लावलेले कांदे होते की नव्हते असे सदृश्य दिसून आले. चांदवड तालुक्यात कांद्याचे सर्वांत आधी पिक घेत असलेले गाव म्हणून ओळख असलेल्या ठिकाणी जोरदार व मुसळधार पाऊस झाल्याने अनेक शेतकरी यांचे नुकसान झालेले आहे. असलेला कांदा हा पुन्हा जीव धरणार नाही त्यामुळे शासनाने 100% नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी असे स्थानिक शेतकरी वर्गाकडून अपेक्षा केली जात आहे.














