राष्ट्रीय पोषण माह उपक्रमांतर्गत नांदगाव येथील कमलाबाई कासलीवाल विद्यालयात इंद्रधनुष्य थाळी उपक्रम साजरा करण्यात आला.
पोषण महा निमित्ताने इंद्रधनुष्य थाळी मांडणी करून विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे सलाड व त्यापासून मिळणारी जीवनसत्त्वे यावर लहान वयातच मार्गदर्शन करण्यात आले. हा अप्रतिम उपक्रम झाला यशस्वितेसाठी विद्यालयातील शिक्षक वृंदाने विशेष परिश्रम घेतले. बालवयातील या संस्काराने निश्चितच सदृढ, सद्गुणसंपन्न आणि आत्मनिर्भर पिढी घडणार याची १०० टक्के खात्री आहे.















