loader image

नांदगाव येथे जलसा- ए- आम सिरतून्नबी” कार्यक्रम संपन्न

Oct 13, 2022


नांदगाव – हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांच्या चरित्राचे परिचय करून देण्याकरीता आमदार सुहास आण्णा रहेनुमा फाउंडेशनच्या वतीने “जलसा- ए- आम सिरतून्नबी” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.नांदगाव शहरातील तसेच परिसरातील अनेक मुस्लीम बांधवांनी कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना अकिल मिल्ली होते. संमेलनात कार्यक्रमांचे प्रमुख वक्ते हजरत मौलाना मुख्तार सईद मदनी यांनी सौम्य वक्तृत्व शैलीत प्रवचन देत पैगंबर साहेबांच्या जीवनातील सामजिक, शैक्षणिक, पारिवारिक, व्यावहारिक कार्यपद्धती सभोवतालच्या लोकांशी आपल्या सहकाऱ्यांशी वागणूक ,मुहम्मद पैगंबर साहेबांची खरी शिकवण काय आहे,संस्कार, शेजारधर्म,देशप्रेम इत्यादींवर प्रवचन देत आजच्या काळाची गरज शिक्षणाचे महत्व, सामाजिक कार्याचे महत्त्व, पैगंबर साहेबांनी आपल्या संपुर्ण आयुष्यात अनाथ गोर गरीब , गरजवंत लोकांंची नेेहमी कशी मदत केेली याची आठवण करून दिली. आजच्या तरुण पिढीने व्यसनाच्या आहारी जाऊन आपले व देशाचे भविष्य बरबाद करू नये, पालकांनी मुलावर लक्ष देणे गरजेचे आहे, मोबाईलचा जास्त उपयोग टाळावा समाजात एकोपा कसा टिकून राहील याकरिता इतर धर्मीय बांधवांशी चांगली वागणूक, आपल्या आचरणाने तसेच सामाजीक कामे करून लोकांची मने कशी जिंकता येते यावर बोलताना त्यांच्या जीवनातील काही अनुभव सांगितले मौलानानी आपल्या सौम्य प्रवचनातून एका तासभराच्या अवधीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाच्या शेवटी हजरत मौलानानी आपल्या देशात व सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती ,समृध्दी, एकोपा टिकून रहावा अशी दुआ करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सुत्रसंचलन मुफ्ती फहीम यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे अध्यक्ष सईद शेख, सचिव अयाजभाई शेख, नईम हनीफ, रियाज पठाण,इम्रान नॉव्हेल्टि वसीम खान, अक्रम मोमीन, इकबाल, अमजद पठाण,नसीर , इम्रान, रमिज कुरैशी, नदीम तांबोळी,इम्तियाज गांधी इत्यादींनी मेहनत घेतली.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.