loader image
[ays_poll id=7]

खेळामुळे युवकांचे जीवन घडू शकते- डॉ. हरिष आडके, मनमाड महाविद्यालयात नाशिक विभागीय आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

Nov 2, 2022


मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालययात आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले या स्पर्धाचे उद्घाटन महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थेचे उपाध्यक्ष मा. डॉ. हरीश आडके यांच्या हस्ते व माजी आमदार राजेंद्र देशमुख, पाेलिस निरीक्षक मा. प्रल्हाद गिते, महाविद्यालयीन व्यवस्थापन परिषद सदस्य मा श्री चंद्रकांत गोगड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. उद्घाटनपर भाषणात मा. डॉ आडके यांनी विद्यार्थ्यांना खेळाविषयी मार्गदर्शन तसेच कबड्डी स्पर्धेची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना सांगून खेळामुळे युवकांचे जीवन घडू शकते असे प्रतिपादन केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतुन महाविद्यालयातील क्रीडा विभागाची माहिती सांगितली. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मनमाड शहर पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते त्यांनी खेळाडूंना खेळाबरोबरच वेळेच्या नियोजनाचे महत्त्व पटवून सांगितले.यावेळी माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले. याप्रसंगी वाहुळकर साहेब, मा. सचिव इंगळे, उपसचिव नरेंद्र निकम, दीपक जुंद्रे, पंच सतीश सूर्यवंशी, बीओएस चेअरमन डॉ सुरेखा दप्तरे, प्रा. रिजवान खान, माजी क्रीडा संचालक विजय पाटील उपस्थित होते. स्पर्धेमध्ये एकूण ५० संघांनी आपली उपस्थिती नोंदवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा.संतोष जाधव यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ पी जे आंबेकर यांनी केले. महाविद्यालयाचे कुलसचिव समाधान केदारे महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार खेळाडू प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ४२ सामने झालेले होते. मनमाड महाविद्यालय, नामपूर महाविद्यालय, सुरगाणा महाविद्यालय तसेच दिंडोरी महाविद्यालयाने प्राबल्य मिळवले होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.