loader image
[ays_poll id=7]

अध्यापकभारतीच्या वतीने शिक्षकेत्तर कर्मचारी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

Nov 16, 2022


येवला (प्रतिनिधी) : शाळा-महाविद्यालये तथा शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाच्या मौल्यवान कार्य प्रक्रियेत प्रशासनाचा अविभाज्य भाग असलेल्या शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनींचा शाळा-महाविद्यालयातील व्यवस्थापन कार्यात बहुमोल योगदान असून शिक्षकेत्तरांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रबळ संघटन असण्याची गरज असल्याचे मत येथे आयोजित शिक्षकेत्तर कर्मचारी सत्कार समारंभात मान्यवरांनी व्यक्त केले.
अध्यापकभारतीच्या वतीने शिक्षकेत्तर कर्मचारी दिनाचे औचित्य साधून येवला तालुक्यातील कर्मचाऱ्यांचा अध्यापकभारती ह्या राष्ट्रीय बालक-विद्यार्थी, पालक,शिक्षक,शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने सत्कार संपन्न झाला.
शिक्षकेत्तर कर्मचारी देत असलेली सेवा हि बहुमोलची असून त्यांच्या ऋणातून समाजाला उतराई होता येणार नसल्याचे प्रतिपादन ह्या वेळी बोलतांना सामाजिक कार्यकर्ते व नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्यवस्थापक सुरेश खळे यांनी केले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब गोरे हे होते.संजय जाधव सर (गवंडगांव),गोरे सर कुसुर,गायकवाड सर धामोडे,राजेंद्र दराडे,गोरख खराटे,लक्ष्मण दाणे,बी.डी.खैरनार,संजय फरताळे,विश्वास जाधव,आनंदा जाधव,आब्रार सर,वसंत पवार,रावसाहेब खराटे,शैलेश आहिरे,नाना काळे आदी शिक्षकेत्तर कर्मचारी ह्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेंद्र वाघ तर सूत्रसंचालन शरद शेजवळ यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.