loader image
[ays_poll id=7]

अनारक्षित तिकिटांबाबत रेल्वे मंत्रालयाचा निर्णय – प्रवाशांना मिळणार दिलासा

Nov 17, 2022


रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. प्रवास करायचा म्हटले तर प्रवाशांना आधी तिकीट बुक करावे लागते आणि त्याकरता स्टेशनला जाऊन रांगेत उभे राहून मग तिकीट मिळायचे. म्हणुनच भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वेच्या काही महत्वाच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.यामध्ये रेल्वे मंत्रालयाने अनारक्षित तिकिटांबाबत निर्णय दिला असून त्यात तुम्हाला आता पूर्वीपेक्षा जास्त अंतरावरून अॅपद्वारे घरी बसून तिकीट बुक करू शकाल. म्हणजे ज्या स्थानकापासून तुम्हाला प्रवास सुरू करायचा आहे, त्या स्टेशनपासून तुम्ही खूप दूर असलात तरीही तुम्ही तिकीट बुक करू शकता.त्यामुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचणार असून प्रवाशांची तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्यापासून सुटका होणार आहे. तसेच रेल्वेच्या नव्या नियमामुळे तिकीट बुकिंग सुविधा अत्यंत सुलभ होणार आहे.
दरम्यान, रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षित आणि अनारक्षित अशी दोन प्रकारची तिकिटे बुक केली जातात. त्यात आरक्षित तिकिटे ऑनलाइन किंवा अॅपद्वारे कुठूनही कोणत्याही ठिकाणासाठी बुक केली जाऊ शकतात, परंतु अनारक्षित तिकिटे प्रवास सुरू होण्याच्या स्थानकापासून मर्यादित अंतरापर्यंतच बुक करता येतात. मात्र आता दोन किमीचे अंतर 20 किमी करण्यात आले आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.