loader image
[ays_poll id=7]

क्षेत्र भेटीतून विद्यार्थ्यांना दिला प्रत्यक्ष ज्ञानाचा अनुभव

Nov 17, 2022


सौ .कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थी दैनंदिन व्यवहारात पारंगत व्हावे तसेच कायदा व सुव्यवस्था यांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाला अनुसरून विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिस ला भेट देऊन तेथील कामकाज कसे चालते याविषयी माहिती जाणून घेतली. डाक सहाय्यक दत्तात्रय भावसार यांनी विद्यार्थ्यांना टपाल कार्यालयातील कामकाज कशाप्रकारे चालते याविषयी माहिती सांगितली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष टपाल कार्यालयातील व्यवहार कसा चालतो याविषयी माहिती मिळावी या उद्देशाने विद्यार्थ्यांना प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.पी सावंत सर यांनी डाक कार्यालयाला विद्यार्थ्यांची भेट घडवून आणली.या भेटीत विद्यार्थ्यांनी आपले काही प्रश्न सुद्धा विचारले आणि आपले ज्ञान वृद्धिंगत केले.
तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी व मुलांना सुरक्षिततेची जाणीव होण्यासाठी आणि शस्त्रांची माहिती मिळावी यासाठी पोलीस स्टेशन येथे क्षेत्रभेट देण्यात आली. तेथे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना शस्त्रांची अतिशय उपयुक्त माहिती सांगितली तसेच रायफल चालवण्याचे प्रात्यक्षिक देखील करून दाखविले तेथे उपस्थित मोरेदादा यांनी विद्यार्थ्यांना सत्याच्या मार्गावर चालण्याची शिकवण दिली. तसेच सोनवणे दादा, मुंडे दादा यांनी सहकार्य केले .शाळेने राबवलेल्या या कार्यक्रमाचे संस्थेचे चेअरमन मा.श्री.सुनिलकुमार कासलीवाल,सचिव विजय चोपडा,प्रशासक प्रकाश गुप्ता,सरचिटणीस प्रमिलाताई कासलीवाल,संचालक महेंद्र चांदिवाल,मुख्याध्यापक श्री.व्ही.पी.सावंत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.सिध्दार्थ जगताप,ईश्वर फणसे,अभिजित थोरात,विजय जाधव,श्रीमती. धन्वंतरी देवरे,निलोफर पठाण,जयश्री चोळके,अनिता पवार,वैशाली शिंदे,यांनी विशेष परिश्रम घेतले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.