शहरात डासांचा प्रार्दूभाव वाढल्यामुळे धूर फवारणी व औषध फवारणी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन नगर पालिकेचे प्रशासक सचिन कुमार पटेल यांच्याकडे राजे युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.
गेल्या महिन्याभरापासून मनमाड शहरात नियमित पणे घंटा गाडी येत नसल्याने व शहरातून वाहणाऱ्या नदी च्या दोन्ही बाजूला कचरा साचल्याने सर्व शहरात डासांचा प्रार्दूभाव वाढल्याची तक्रार नागरिकांनी आमच्याकडे केली आहेत. तसेच डासामुळे शहरातील नागरिकांना डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झाली आहे. तसेच काही नागरिकांना मलेरिया ची लागण झाली असल्याचे समोर आले आहेत. नगरपालिका आरोग्य कर्मचारी यांना वारंवार सांगून त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. तीन महिन्यामध्ये नदीला दोनदा खूप मोठया प्रमाणात पूर आला होता. या पुरामुळे साचलेल्या पाण्यात डासांची अंडी साचून धोकादायक डेंग्यू चा प्रसार होत असून मागच्या काही दिवसात डेंग्यू चा शहरांत तब्बल 60 ते 70 रुग्ण आढळून आले आहेत. ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन आपण
स्वतः पुढाकार घेऊन हे धूर फवारणी व औषध फवारणी चे काम करून घ्यावे अशी विनंती करण्यात आली आहे.
निवेदनावर राजे युवा प्रतिष्ठाण तसेच छोटू राऊत,अमोल परदेशी,आशिष पराशर,मोसीन भाई,बाळा भाऊ महाले,भाऊसाहेब वाळुंज,मोनू गांजे,निखिल पवार, महेश गवळी, गणेश भाऊ सांगळे, सोमनाथ जाधव, दीपक जगताप, मच्छिन्द्र जाधव,ललित बुरड,मंगेश परदेशी,गौरव जगताप,तुषार टेलर,मुदसर शेख,दत्तू मामा शिंदे,अरविंद जाधव,राजू भाऊ मोरे,आप्पा गवळी ह्यांच्या सह्या आहेत.












